Saturday, 20 June 2015

वर्तमानपत्रांचे समाजातील स्थान.

                  वर्तमानपत्रांचे समाजातील स्थान.

            आज एकविसाव्या शतकात वर्तमानपत्रे ही समाजाचा आरसा आहेत. त्याचबरोबर वर्तमानपत्रे ही आजची अनिवार्य गरज झाली आहे. विचारवंतांना  वाटत होते, दूरचित्रवाणीच्या या युगात वर्तमानपत्राचे महत्त्व कमी होईल. पण आता दूरचित्रवाणी येऊन पस्तीस वर्षे होऊन गेली तरी वर्तमानपत्रांचे महत्त्व कमी झाले नाही, उलट वाढेलच आहे. वर्तमानपत्रांचे वाचक पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वाढले आहेत. आणखी एक विशेष असा की, ’मूर्ती लहान पण कीर्ती महान’ अशा या वृत्तपत्रांचा समाजाच्या सर्व स्तरांत  सारखाच संचार असतो. महाल, प्रासाद आणि आजकाल मोठमोठ्या प्लॅटमध्ये राहणाऱ्या श्रमिकालाही वर्तमानपत्र हवे असते. प्रत्येकाचे हेतू, उद्दीष्ट वेगवेगळे असेल, पण वर्तमानपत्राची वाट सर्वजण तेवढ्याच उत्कट्तेने पाहत असतात.  
            आपल्या देशात एकोणिसाव्या शतकात वृत्तपत्रांचा जन्म झाला. मुद्र्णकलेच्या शोधनंतर त्याला खरे बाळ्से आले. पण जन्मापासूनच त्याची नाडी समाजाशी जुळलेली. मराठीतील पहिल्या वर्तमानपत्राचे नाव होते- दर्पण. खरोखर वृत्तपत्र हा समाजाचा ’दर्पण’च असतो. वृत्तपत्रांची महत्त्वाची कामगिरी दिसून येते ती ’समाजप्रबोधना’ची . समाजातील ज्या ज्या विचारवंताला, समाजसेवकाला, राजकीय धुरिणाला लोक जागृती करावीशी वाटली, त्याने ’वर्तमानपत्रा’चाच आधार घेतला.
            लोकमान्य टिळकांच्या ’केसरी’, ’मराठा’ यांनी निद्रिस्त समाजाला जागे करून उन्मत्त ब्रिटिश सरकारला सवाल केला- ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? इष्ट वाटेल ते करणार आणि वाटॆल ते लिहिणार, ही प्रतिज्ञा करुन आगरकरांनी ’सुधारका’त समाजातील मूर्ख रुढींवर हल्ला चढविला. शिवरामपंत परांजपे यांचा ’काळ’, अच्युतराव कोल्हटकरांचा ’संदेश’ यांनी समाजाला सतत धगधगते ठेवले. ह. ना. आपटे यांचा ’करमणूक’ समाजाची करमणूक करताना  समाजाच्या डोळ्यांत अजंन घालत होता. ’हरिजन, मधून गांधीजी समाजाला सतत उत्तेजित करत होते, समाजाच्या दोषांवर बोट ठेवत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात आचार्य अत्रे यांच्या ’मराठा’ने समाजाला सतत जागृत ठेवले.
            आज वर्तमानत्रांतून विविधता आढळते. वेगवेगळ्या भाषांतून वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे समाजाचे मनोगत व्यक्त करत असतात. ’वार्ता’, ’बातमी’ देणे हे वर्तमानपत्राचे काम असले तरी याहून अनेक मार्गांनी वृत्तपत्र समाजाला घडवत असते. घडणाऱ्या घडनांवरील टिप्पणी, स्फुटलेखन, अग्रलेख इत्यादींतून समाजाची विचारधारा घुसळ्ली जाते. त्याचबरोबर येणारे चित्रपट, नाटके, नवी पुस्तके यांतून बदलणाऱ्या, तसेच, नव्या विचारप्रणाली वृत्तपत्रे समाजापर्यंत पोहचवितात. ’जाहिरात’ ही आजच्या वृत्तपत्राची आणि समाजाची आत्यंतिक गरज आहे. आज लोकशाहीत लोक, अगदी सर्वसामान्य माणूस आपले मनोगत वृत्तपत्रांतून व्यक्त करुन सरकारवर, म्हणजेच शासनावर अंकुश ठेवू शकतो. म्हणून वृत्तपत्रांचे समाजातील स्थान फार महत्त्वाचे आहे
.  
      पंधराव्या शतकात प्रिटिंग प्रेसचा शोध लागला. त्यानंतरच अर्थातच ज्ञानप्रसारात किंवा माहितीच्या क्षेत्रात एक नवीन युग अवतरल. हि गोष्ट फक्त पुस्तकांपुरती मर्यादीत राहिली नाही. तर १९०५ मध्ये पहिल वर्तमानपत्र लोकांसमोर आल. त्यानंतर मुद्रित माध्यमाचा हा प्रसार सर्व अंगांनी आजतागायत होतच राहिला आहे; पण विशेषत: वर्तमानपत्र ही युरोपमध्ये ४०० वर्षांपुर्वी सातत्यान वाढत गेला आहे. १९९० च्या सुमारास पाश्चिमात्य देशातील वर्तमानपत्रखपाला थोडेसे अडथळे निर्माण झाले, असं म्हणता येइल. अर्थात पाश्चिमात्य किंवा विकसित देशांमध्ये वर्तमानपत्रांचा खप लोकसंख्येच्या जवळ्पास ९० टक्क्यांच्या आसपास पोचलेला होता. पण याविरुद्ध आशिया, दक्षिण अमेरीका, आफ्रिका येथे जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा जास्त राहते, तिथं मात्र आजही वर्तमानपत्र ही वाढत्या संख्येन दिसतात. 

पावसाळा......

                             पावसाळा......

 पावसाळा नेहमीच मला गत स्मृतींमध्ये घेऊन जातो. सोसाट्याचा वारा आणि गर्ज्त येणारे काळे ढग, विजांचा चकचकाट आणि मग कोसळणारा पाऊस .कोकणातला पाऊस असाच यायचा. यायचा असा की, थांबायचं नाव घेत नसे. त्या पावसात मग सगळेच चिंब होवून जात. आहोळ, नद्या-नाले ओसंडून वाहू लागत. ’व्हाळाक पूर इलो ….., बघूक येतस?’ अस विचारत मित्र यायचे आणि पाऊलं आपसूकच  तिकड वळायची. झऱ्याचंच साम्राज्य पसरयला लागायचं. घरासमोरच्या विहीर तुडूंब भरु वाहू लागे. एकदा का हा पाऊस सुरु झाला की मग पुढ्चे  चार महिने अगदी दीवाळी पर्यंत विहीर वाहतच असे.
   आभाळ दाटून येई तसा पाऊसही दाट पडायचा.चार चार दिवस अविश्रांत पडयचा. शेतकरी आणि  शाळेतली आम्ही मुलं सगळेचं पावसात चिंब होत असू. मुलांजवळ छत्री असूनही तो पाऊस छ्त्रीला जुमानणारा नव्हता. शेतकऱ्याच्या डोक्यावर मात्र खोळ किंवाइरलं’( पानं आणि बाबूंपासून बनवलेल ) असायचं. आमच्या शाळेच्या वाटेवर चार आहोळ होते. ते पार करुन शाळेत जाणं म्हणजे काही वेळा खुप कठीण व्हायचं. आहोळावर असणाऱ्या साकवांना खालून रोरावत येणारं पाणी वाकुल्या दाखवत स्पर्श करायचं तेव्हा त्या साकावावर पाय ठेवायला धजावत नसे. रामेश्वराच्या देवळाजवळ्च्या आहोळाजवळ शांताराम राहयचा.अशा प्रसंगी तोच आम्हाला हाताला धरुन साकव पार करुन दयायचा. पुढे मग वाटभर पायाने पाणी उडवत, खेळत आम्ही शाळा गाठत असू.
पहिल्याच पावसात जमिन हिरवीगार होवून जात असे. झाडाखाली तशाच पडून असणाऱ्या काजूच्या बियांना मग कोंब येत असत. डाब थोडा बाहेर आल्यावर ते खायला फार मजा येत असे. शेवरी, अळंबी, तेरं, घोटाचे वेल, खडपं अळू, सुरण अशा रान भाज्या तरारुन वर येत. फणसाच्या घोट्या घालून आई त्याची सुरेख भाजी बनवायची. रानातल्या  इतर फळांचा सुकाळ संपला तरी पावसाळ्यात पेरुला लाल लाल पेरु लागायचे. बावल्याखडपात बांदीवर एक जगमाचं झाड होत. त्याला लागलेली जगमं काटे वाचवून काढावी लागत. घशाकडॆ जरा खेपणारी हे जगमं हातात वाटॊळी घालून फिरवून मऊ करायची आणि मग खायची. थोड्याच दिवसात भिरमोळ्याचे वेल वर झाडावर उंच चढायचे. मोठ्या झालेल्या वेलांचा अंदाज घेवून तो जमिनीतून काढ्ला की, खाली असलेला कंद सोलून खायला मिळे. पावसाळाच्या अर्ध्यावर आल्या की, कोवळ्या चिंचा आणि तोरंजन असा आबंट मेवा आमच्यासाठी तयार असायचा. जाता जाता वाटेतच मिळणार किती हे धन? तिथली जमीन आमच्यासाठी अन्नपूर्णा असायची.
                        किती पडतो पाउस
                        थेंबा थेंबाचा नगारा
                         कसा घेवू, कुठे ठेवू
                         त्याचा अफाट पसारा
किती पडतो पाऊस
                                झाडां पेडांचा आसरा
                                मुंग्या वारुळाच्यामध्ये

                                वर अळंब्याच्या गारा
                           किती पडतो पाऊस
                           शेत, रान झालं चिंब
                           वर फुटलासे पान्हा
                           आड गेले सुर्यबिंब
                                   किती पडतो पाऊस
                                   रानवेली झाल्या मत्त
      दूर वाजतसे पावा
         झाले चित्त प्रफुल्लीत


पावसाळ्यात शाळेला अचानक सुट्टी मिळायची, कधी कधी मग शाळा सुद्धा पावशाळा होऊन जायची. शाळेत गेल्या गेल्या एखादा दुसरा तास घेऊन शाळा सोडली जायची. श्रावण सोमवारी शाळा अर्धा दिवस असायची.